नेवासा – राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे. याशिवाय सौर उर्जा प्रकल्पांमुळे आगामी पाच वर्षांत १०० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर ५ रुः ८७ पैसे प्रति युनिटपर्यंत तर १०१ ते ३०० युनिट वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे दर ११ रुपये ८२ रुपये प्रति युनिटपर्यंत टप्प्याटप्प्याने कमी होतील, अशी माहिती महावितरणचे स्वतंत्र संचालक आणि प्रदेश भाजपचे सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी शुक्रवारी येथे दिली.

१०० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर ५ रुपये ८७ पैशांपर्यंत तर-१-०१-ते- ३०० युनिट वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचा दर ११ रुपये ८२ पैशांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणने राज्य वीज नियामक आयोगापुढे ठेवला असल्याचेही पाठक यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सौर ऊर्जा निर्मितीच्या धडाकेबाज कार्यक्रमामुळेच शेतकरी, घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांचा फायदा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २..० योजनेमुळे राज्यात आगामी दोन वर्षांत १६ हजार मेगावॅट एवढी सौर वीज निर्मिती होणार आहे. त्याचा मोठा फायदा महावितरणला होणार असल्याने महावितरणचा सरासरी वीज पुरवठ्याचा २३ ते १२ टक्क्यांपर्यंत कमी होतील. औद्योगिक ग्राहकांसाठीच्या सर्व सवलती, प्रोत्साहन योजना चालू ठेवण्यात येतील. तसेच. औद्योगिक ग्राहकांना क्रॉस सबसिडी देण्याची गरज पडणार नसल्याचे विश्वास पाठक यांनी सांगितले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.