कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली द्वारा संपूर्ण भारत देशात केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे संकल्पनेतून कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून खरीप हंगाम पुर्व विकसित कृषि संकल्प अभियानाचे आयोजन दिनांक २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान करण्यात आले आहे. या अभियानाचा प्रारंभ अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातून करण्यात आला. दिनांक ३१ मे व १ जून दरम्यान कर्जत तालुक्यातील निंबोडी, कापरेवाडी, आंबीजळगाव, परीटवाडी, चिलवडी, बारडगाव सुद्रिक, डिकसळ, बाभुळगाव, बेलगाव, कोपर्डी, रुइगव्हाण, धालवाडी या निवडक १२ गावात विकसित कृषि संकल्प अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने, ता.शेवगाव व आय सी ए आर राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या दृष्टीने तांत्रिक मार्गदर्शन केले.

तसेच तालुका कृषि अधिकारी व आत्मा कर्जतच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना बाबत माहिती दिली. या अभियानाच्या दरम्यान केंद्राच्या मार्फत कृषि रथ फिरवून कृषि योजना व कृषि तंत्रज्ञान विषयी जन-जागृती करण्यात आली. इफको च्या माध्यमातून विविध गावामध्ये कृषि ड्रोन चे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच या कालावधीमध्ये विविध नवीन तंत्रज्ञानाची प्रात्याक्षिके शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर देण्यात आली.
सदर अभियानामध्ये श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने चे शास्त्रज्ञ, लाखे एम.पी., निबे एन.बी., बडधे एस.डी., राहुल पाटील, दहातोंडे नंदकिशोर, हिंगे पी.एस., बहिरट पी.एस., डॉ. गवळी सी.एन., नियासम बारामती चे शास्त्रज्ञ डॉ. डी.बी. नांगरे व डॉ. सुशील चांगण, कर्जत तालुका कृषि अधिकारी व कृषि विभागाचे अधिकारी बापूराव आढागळे, रोहन तोरडमल, सतीश सरोदे, गणेश शेंदुरकर, दत्ता भोसले, दत्तात्रय अनारसे, रावसाहेब पाटील, बी टी एम आत्मा,

सुपेकर विकास, शेखर खोडवे, बापू होले, एटीएम आत्मा, श्री. येळपने, श्री सुद्रिक ए.बी., नवसरे एन.एम., गर्जे डी.ए., नवले पी.जे., यांनी सहभाग घेतला. तसेच या अभियानामधील १२ गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य श्री संजय थेटे, श्री.जयशिंग पाटील, श्री.सचिन बाबर, श्री संतोष गांगर्डे, श्री.अंकुश निखत, दिपक काळे, राजेश गायकवाड यांनी या अभियानात सामील होऊन तंत्रज्ञान व योजनांबद्दल माहिती घेतली. तसेच प्रगतशील शेतकरी, एफ.पी.ओ. चेअरमन श्री. हरिश्चंद्र सुद्रिक, श्री. पोपट जगताप, श्री. यमाजी वाडकर, कदम सर, तसेच महिला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभाग घेतला.
कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने द्वारा कार्यक्षेत्रातील ७ तालुके जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, नगर, पाथर्डी, शेवगाव व नेवासा मधील एकूण ९० गावांमध्ये विकसित कृषि संकल्प अभियान राबविण्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या प्रत्येक गावांमध्ये कृषि रथ जाणार असून शास्त्रज्ञ व अधिकारी शेतक-यांना मार्गदर्शन करणार आहेत. या अभियानामध्ये जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभाग नोंदवून शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाचा व शासकीय योजना विषयी माहितीचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने च्या वतीने करण्यात येत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.