ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban

नेवासा – उल्हास नवसाक्षरता अभियानांतर्गत गेल्या वर्षभरात स्वयंसेवकांनी साक्षरतेचे धडे दिलेल्या जिल्ह्यातील ३२ हजार ५४० असाक्षरांची येत्या रविवारी (दि. २३) परीक्षा होणार आहे. दहावी-बारावी “विद्यार्थ्यांची परीक्षा नुकतीच संपली. त्यानंतर आता ही आजी-आजोबांची परीक्षा होत आहे. केंद्र पुरस्कृत उल्लास नवसाक्षरता कार्यक्रमांतर्गत २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत साक्षरता मोहीम राबविली जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात २०२४-२५ या वर्षात २८ हजारांचे उद्दिष्ट मिळालेले आहे. जिल्हाधिकारी डॉ. – पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही – मोहीम जिल्ह्यात सुरू आहे.

परीक्षा

जिल्ह्यात नेमलेल्या स्वयंसेवकांमार्फत १५ वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील असाक्षर व्यक्तींमध्ये वाचन, लेखन व
संख्याज्ञान विकसित करून त्यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण जीवन कौशल्य विकसित करावयाची आहेत. या कौशल्यामध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जांगरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण या बाबींचा समावेश आहे. जिल्ह्यातील १३ हजार १३४ स्वयंसेवकांनी गेल्या वर्षभर जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे ३२ हजार ५४० असाक्षरांची नोंदणी केली आहे. त्यांची मूल्यमापन चाचणी रविवारी (दि. २३) होणार आहे. अजूनही कोणाची नोंदणी झालेली नसेल तर त्यांनी नोंदणी करण्यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना संपर्क करावा. त्यांनाही रविवारी परीक्षा देता येईल.

परीक्षा

जिल्ह्यातील १०० टक्के असाक्षरांना या परीक्षेत उपस्थित ठेवून परीक्षा घेण्याचे आवाहन डायटचे प्राचार्य डॉ. राजेश बनकर,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी अशोक कडूस (माध्यमिक) व शिक्षणाधिकारी बाळासाहेव बुगे (योजना) यांनी केले आहे.
जिल्ह्यात ४ हजार केंद्र
असाक्षर प्रौढांनी ज्या शाळेतून नोंदणी केली, ती शाळाच त्यांचे परीक्षा केंद्र राहणार आहे. यात बहुतांश केंद्र ही गावातील जिल्हा परिषद किंवा माध्यमिक शाळा आहेत. गेल्यावर्षी आठ हजार प्रौढ साक्षर झाले होते.
दीडशे गुणांची परीक्षा
दीडशे गुणांच्या या परीक्षेत वाचन, लेखन आणि संख्याज्ञान या घटकांवर प्रत्येकी ५० गुणांचे प्रश्न असतील. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक घटकात ३३ टक्के म्हणजे किमान १७ गुण मिळवावे लागणार आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत प्रौढांना आपल्या सोयीनुसार कधीही शाळेत जाऊन दीड तासात ही परीक्षा देता येईल.

newasa news online
परीक्षा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

परीक्षा
परीक्षा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

परीक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *