नेवासा – तालुक्यातील श्री क्षेत्र कानिफनाथ गड मढी ते श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड, मायंबा या सुमारे साडेतीन किलो मीटर लांबीच्या रोपवेच्या कामास केंद्रीय परिवहन व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राष्ट्रीय रोप-वे कार्यक्रम पर्वतमाला योजनेअंतर्गत तत्वतः मान्यता मिळाली असल्याची माहिती आ. राजळे यांनी दिली.
आ. राजळे म्हणाल्या, श्रीक्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथ समाधी मंदिर असून चैतन्य कानिफनाथ मंदिरापासून जवळच श्रीक्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथ महाराज यांचे समाधी मंदिर आहे. या दोन्ही ठिकाणी राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. श्री
क्षेत्र कानिफनाथ गड ते श्री मच्छिंद्रनाथ गड हे गर्भगिरीच्या पर्वतमय रांगांच्या अतिशय डोंगर परिसरात निसर्गरम्य वातावरणात वसलेली देवस्थाने आहेत.

सदर दोन्ही देवस्थानांच्या गडांना जोडणाऱ्या डोंगर रस्त्याचे अंतर ९ कि.मी. आहे. परंतू हवाई अंतर ३.६ कि.मी. आहे. या उपक्रमामुळे भाविकांची वेळेची बचत होवून पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये अतिशय समाधानाचे वातावरण आहे. श्रीक्षेत्र कानिफनाथ गड मढी ते श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड सावरगाव येथे ३.६ कि.मी. लांबीच्या रोपवेच्या कामास राष्ट्रीय रोप-वे कार्यक्रम पर्वतमाला योजनेअंतर्गत तत्वतः मान्यता मिळाली आहे.

या कामास मंजुरी मिळणेसाठी ना. गडकरी वना. फडणवीस यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरू होता. तसेच मागील महिन्यात श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना त्यावेळीही या कामाची मागणी त्यांचेकडे केली होती. त्यावेळीच रोप-वेचे काम लवकरच मार्गी लागेल असे त्यांनी आश्वसीत केले होते. दरम्यान, रोपवेच्या कामास मंजुरी मिळाल्याबद्दल आ. मोनिका राजळे यांनी केंद्रीय परिवहन व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.