नेवासा – शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील गेवराई येथे शनिवारी दुपारी घडली.
मयूर संतोष शिनगारे (वय १२), पार्थ उद्धव काळे (वय ७) अशी शेततळ्यात बुडून मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. यातील मयूर शिनगारे हा इयत्ता पाचवीमध्ये, तर पार्थ काळे हा इयत्ता दुसरीमध्ये शिकत होता.

शनिवारी दुपारी मयूर आणि पार्थ हे दोघे आई-वडिलांबरोबर शेतात गेले होते. आई-वडील शेतात काम करीत असताना, दुपारच्या सुमारास मयूर व पार्थ हे दोघे शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले. दोघांनाही पोहता येत नसल्याने पाण्यात बुडाले. बुडत असताना दोघांनी आरडाओरडा केला. तो आवाज मिरची तोडणीचे काम करत असलेल्या महिलांना गेला. महिलांनी मुले शेततळ्यात बुडत असल्याचे पाहून आरडाओरडा केला. मात्र, मदतीला इतर लोक येईपर्यंत दोन्ही मुले पाण्यात बुडाली. शेततळे ४० फूट खोल असल्याने इतर पोहणाऱ्या लोकांनाही त्या मुलांना बाहेर काढता आले नाही. अखेर शेवटी जेसीबीच्या साहाय्याने शेततळे फोडून मुलांना बाहेर काढण्यात आले. त्यांना नेवासा फाटा येथील शासकीय रुग्णालयात आणले. तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.

१५ दिवसांपूर्वीच झाले होते शेततळे
पंधरा दिवसांपूर्वीच उद्धव काळे यांनी शेततळे खोदले होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी शेततळ्यामध्ये पाणी भरले होते. त्यानंतर ही हृदयद्रावक घटना घडली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.