नेवासा – रेश्मा शामू ईरले यांच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्या डॉ. त्रिभुवन व भुलतज्ञ डॉ. चावरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नेवासा पोलीस स्टेशनला देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. १८/०४/२०२५ रोजी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान नेवासा येथील साईसेवा हॉस्पिटल येथे रेश्मा ईरले या महिलेला गर्भपिशवी ऑपरेशन साठी दाखल करण्यात आले होते. त्या प्रसंगी डॉ. त्रिभुवन यांनी संगितले की, दि. २१ एप्रिल २०२५ रोजी सदर महिलेचे ऑपरेशन करावे लागेल.

तुम्ही पैशांची व्यवस्था करून ठेवा असे सदर महिलेच्या घरच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. परंतु २० एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. सदर महिलेला आचानक ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आले व लगेच भूल तज्ञ डॉ. चावरे यांना बोलवून घेतले व ऑपरेशनला सुरुवात केली. ऑपरेशनप्रसंगी सदर महिलेची प्रकृती खालावली व लगेच डॉक्टरने सदर महिलेच्या घरच्यांना सांगितले की, पेशंट सिरियस झाल्याने त्यांना लगेच अ.नगर किंवा पुण्याला घेऊन जावे लागेल असे सांगितले.
त्या प्रसंगी रुग्णाच्या पतीने व इतर नातेवाईकांनी डॉक्टरांना जाब विचारुन म्हणाले की, आमचे पेशंट चांगल्या अवस्थेत होती तुम्ही आम्हाला न सांगता अचानक एक दिवस अगोदरच ऑपरेशन साठी घेतले व तुम्ही ज्या चावरे डॉक्टरांना बोलावले त्याच डॉक्टरांकडून भुल देत्यावेळेस जास्त प्रमाणात भुलीचे औषध दिल्याने सदर रुग्ण महिलेची प्रकृती खालावली आहे असे बोलून दार आरडाओरडा चालू करून आमच्या पेशंटला निट करा किती ही पैसे लागते असे त्या प्रसंगी सर्व नातेवाईक म्हटले असता डॉ. त्रिभुवन व डॉ. चावरे म्हणाले की, तुमच्या पेशंटला काहीच होणार नाही.

आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही पण तुमच्या सोबत येऊ. सदर पेशंटचा योग्य ईलाज करु असे सांगून विविध कागदावर डॉ. त्रिभुवन यांनी नातेवाईकांच्या सह्या घेतल्या व त्यानंतर अॅम्ब्युलन्स मध्ये पेशंट व पेशंटचे नातेवाईकांना अॅम्ब्युलन्समध्ये बसवले व म्हणाले की, तुम्ही पुढे चला मी पाठीमागून येतो. परंतु डॉ. त्रिभुवन आले नाही. सदर रुग्णालय अ.नगर येथील सुरभी हॉस्पिटल येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी पेशंटला मृत घोषीत केले व त्या हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या हाताखाली असलेले कर्मचाऱ्यांनी सांगितले की, नेवासा येथील डॉ. त्रिभुवन व डॉ. चावरे यांच्या हालगर्जीपणा मुळे व अतिप्रमाणात भुल दिल्यामुळे सदर रुग्णाचे मृत्यु झाला आहे असे सांगितले आहे व रुग्णांच्या सर्व नातेवाईकांचे आरोप आहे की, डॉ. त्रिभुवन व डॉ. चावरे यांच्या निष्काळजीपणामुळे आमच्या पेशंटचा मृत्यु झाला आहे. म्हणून सदर घटनेची सखोल चौकशी करुन दोर्षीवर डॉ. त्रिभुवन व डॉ. चावरे यांच्या विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व साईसेवा हॉस्पिटलची मान्यता रद्द करून दोन्ही डॉक्टरांचे (सनद) रजिस्टेशन रद्द करण्यात यावे व साईसेवा हॉस्पिटलला कायमस्वरुपी सिल करण्यात यावे.

आमच्या निवेदनाची दखल घेऊन ४ ते ५ दिवसांमध्ये सदर घटनेची चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदोलना प्रसंगी काही अनुचित प्रकार घडल्यास आंदोलनकर्ते जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. सदर निवेदनावर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे,जिल्हा सचिव संजय नवथर,तालुकाध्यक्ष दिगंबर पवार,शहराध्यक्ष रविंद्र पिंपळे,शहर संघटक दादा देशमुख,शहर सचिव योगेश साळवे,शहर उपाध्यक्ष तुषार गायकवाड,विल्यम गायकवाड यांच्या सह्या आहेत


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.