संपूर्ण देशात गोहत्या महत्त्वाचा मुद्दा बनला असून शासन यावर खडक निर्बंध आणून जास्तीत जास्त करत कारवाई गोतस्करांवर करत आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील नेवासा ही गोतस्करीचे प्रमुख केंद्र मानले जातात.
इथेही सर्वात मोठ्या प्रमाणात गोहत्या चालत होती, परंतु तीन महिन्यासाठी परिविक्षा दिन पोलीस उपअधीक्षक संतोषजी खाडे साहेब यांनी नेवासा पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर गोतस्कराबाबत कडक अशी भूमिका घेतली व कार्यकाळ च्या शेवटच्या दिवसापर्यंतही आपली भूमिका तशीच ठेवली.

त्यांच्या काळात सर्वात जास्त गोहत्याच्या कारवाई झाल्या. सलाबतपुर,नेवासा या ठिकाणी मोठ्या कारवाई झाल्या, तसेच कातडी वाहणारे ट्रकही धरण्यात आले, तडीपार असलेले गुन्हेगारही इथे वावरत असताना साहेबांनी पकडून काढले. त्यांच्या काळात तीन महिन्यात सर्वात जास्त कारवाई झाल्या असेच अधिकारी प्रत्येक ठिकाणी असतील तर लवकरच संपूर्ण देशातील गोहत्या पूर्णपणे थांबेल अशी भावना बजरंग दल गोरक्षा प्रमुख पश्चिम महाराष्ट्र प्रांत:- ऋषीकेश भागवत यांनी दिली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.