नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील – सध्या शेत व शिव पानंद रस्त्यांची शासकीय प्रकरणे निकालात लवकरात लवकर निघत नाही म्हणून त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा माननीय जिल्हाधिकारी व त्यांची सर्व प्रशासकीय अधिकारी आणि अहिल्या नगरचे जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू एस शेंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शेत रस्ता समस्या सोडविण्यासाठी समन्वयाची भूमिका पार पाडण्यासाठी व शेत रस्त्यांचे प्रश्न निवारणासाठी व निफटार्यासाठी एक संयुक्त मेळावा आयोजित करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद रस्ता चळवळीचे राज्य उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी नुकतीच जिल्हाधिकारी माननीय श्री पंकज आशिया साहेब यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे

लवकरच शेतकऱ्यांच्या शेत रस्ते प्रश्न मार्गी लागण्यासाठी असा मेळावा लवकरच घेऊ अशी सकारात्मक भूमिका माननीय जिल्हाधिकारी यांनी घेतली आहे
शेतकऱ्यांचे वैयक्तिक रस्त्याचे प्रकरणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम 143 अन्वये व मामलेदार ॲक्ट 1906 चे कलम 5 /2अन्वये करावे लागतात परंतु त्यामध्ये न्याय प्रणाली सकारात्मक नसल्यामुळे अधिकाऱ्यांकडून निकाल व्यवस्थित दिला जात नाही म्हणून शेतकरी अत्यंत त्रस्त झालेले आहेत तसेच काही शिव रस्त्यांचीही प्रश्न मार्गी लागत नाही यावर उपाय म्हणून जिल्हा न्यायाधीशांचे मार्गदर्शन ही आवश्यक आहे त्याकरता असा मेळावा घेतला जाणार आहे अशी माहिती रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी दिली आहे हा मेळावा सर्व शेत रस्ता समस्याग्रस्त शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.