नेवासा : तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून, महसूल व कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात मात्र ६५ टक्के पर्जन्यमान झाल्याची अट न धरता वास्तवात शेत पिकांचे नुकसान पाहून पंचनामे करण्याच्या सूचना आ. विठ्ठलराव लंघे यांनी दिल्या आहेत.
तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांचे पंचनामे करून बळिराजाला नुकसानभरपाईचा हात देण्याची मागणी आ. लंघे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली असता प्रत्यक्षात तहसीलदार डॉ. संजय बिराजदार यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेत पिकांचे पंचनामे करण्याचे लेखी आदेश महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाला दिलेले असताना या पथकाने प्रत्यक्षात मात्र तालुक्यातील ६५ टक्के पर्जन्यमान झालेल्या शेतकऱ्यांच्याच पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू केले होते.

इतर शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान होऊनही त्यांचे पंचनामे केले जात नसल्यामुळे पुन्हा एकदा आ. लंघे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी आणि प्रातांधिकाऱ्यांना ६५ टक्के पर्जन्यमानची अट न धरता प्रत्यक्षात शेतपिकांचे नुकसान पाहून सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. त्यामुळे आता वंचित शेतकऱ्यांच्या शेत पिकांचेही पंचनामे केले जाणार असल्यामुळे आ. लंघे यांच्या पाठपुराव्याचे शेतकऱ्यांतून कौतुक केले जात आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.