नेवासा- मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “जनता दरबार” उपक्रमाला सलग दोन वर्षांपासून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारास देखील नागरिक, शेतकरी, महिला, युवा वर्ग तसेच वडीलधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
दरबारामध्ये मांडलेल्या विविध समस्या ऐकून त्यावर त्वरित कार्यवाहीसाठी दिशा दिली गेली. यापैकी सुमारे 50% समस्या जागेवरच निकाली काढण्यात आल्या असून उर्वरित प्रलंबित समस्यांवर पाठपुरावा करून त्या सोडवण्याची खात्री यावेळी देण्यात आली.

नागरिकांशी संवाद साधताना नेवासा तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि मनमानी सुरु असल्याची बाब अधोरेखित झाली. कूपन, डोल यांसारख्या शासकीय सेवा व योजनांमध्ये दलालीची भूमिका वाढत असल्याबाबत नागरिकांनी तक्रारी मांडल्या. या पार्श्वभूमीवर निष्क्रीय अधिकाऱ्यांविरोधात तसेच दलाली समाप्त करण्यासाठी लवकरच मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला.
गोरगरीब नागरिक, शेतकरी व महिला वर्ग यांच्या न्यायासाठी नेहमीच तत्पर राहणार असल्याचे सांगत, यापूर्वी झालेल्या आंदोलनांचे परिणाम जनतेने पाहिल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पुढील काळात कूपन-डोल संदर्भातील भ्रष्टाचार उघड करून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी गरज पडल्यास आंदोलन छेडले जाईल, तसेच बचत गट संदर्भातील चालू असलेले एक मोठे स्कॅम सुद्धा लवकरच समोर आणण्यात येईल असा शब्द यावेळी देण्यात आला.
— मा. श्री. अब्दुलभैय्या शेख
युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
नेवासा तालुका

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.
a

