राहुरी, नेवासा आणि संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी निकाली
नेवासा-जिल्ह्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे अनेक भागात खरीप हंगाम पिकांची वाट लागलेली असतांना आता राहुरी, नेवासा, संगमनेर या तालुक्यातील १०० हून अधिक शेतकऱ्यांना कापूस उत्पादक कंपन्यांकडून सदोष बियाणे विक्री केले असल्याची तक्रार कृषी विभागाकडे आलेली होती. या तक्रारीवर कृषी विभागाने महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या शास्त्रज्ञासह पाहणी करून सदोष बियाणे नव्हे तर कपाशीच्या ठराविक बानावर यंदा व्हायरसचा जादा प्रार्दुभाव झाला. यामुळे कपाशी वानाच्या कपाशी पिकावर बोंड आणि पान गळती अधिक झाली. तक्रार असणाऱ्या शेतकऱ्यांना तपासणीचा अहवाल सुपूर्द करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
नगर जिल्ह्यात राहुरी, नेवासा आणि संगमनेर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड केली जाते. यंदा देखील जिल्ह्यात अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड झाली होती.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

