ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पहिला पाचेगाव बंधाऱ्यात सकाळी साडे अकराच्या दरम्यान पाणी दाखल झाले.सर्व मोऱ्यात तीन फळ्या आडवून काल सायंकाळच्या सुमारास पाणी पुनतगाव बंधाऱ्याकडे झेपावले होते.आज रात्रीच्या सुमारास पुनतगाव बंधाऱ्यातुन देखील सर्व मोऱ्यात तीन फळ्या पाणी अडवून सायंकाळी नेवासा तालुक्यातील मध्यमेश्वर बंधाऱ्यात पाणी दखल होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नेवासा तालुक्यातील सर्व तीन बंधाऱ्यात तीन फळ्या टाकून पाणी आडविण्यात येणार असल्याने तालुक्यातील या भागात पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठी मदत या सोडण्यात आलेल्या पाण्यातून होणार आहे.उन्हाळी शेती आवर्तन देखील मिळणार ,त्यामुळे नदीवरील शेतकऱ्यांना बरोबर आता पाट पाणी क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे.

पाणी

या तिन्ही बंधाऱ्यावर जवळपास बारा ते तेरा गावे अवलंबून आहे,त्यात हजारो एकर क्षेत्र या पाण्यावर अवलंबून असून ही हजारो एकर क्षेत्रावरील पिके अति तीव्र उन्हामुळे पाणी मागत होती.बंधाऱ्याच्या कडेल असणारे पिके वाळू लागली होती.त्यात कांदा,ऊस,मका,उन्हाळी बाजरी,भुईमूग,गहू व इतर चारा पिके आहे.पण पाण्याचे स्त्रोत सगळी कडून कमी झाल्याने आणि त्यात या अगोदर बंधाऱ्यात देखील पाणी नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याच्या समस्या निर्माण झाले होते.पुढील दोन महिन्यांनी काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज शेतकऱ्यांनी घेतला असल्याने या तालुक्यातील तिन्ही बंधाऱ्यात पाणी सोडवून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला.

पाणी

या भागातील शेतकऱ्यांना व नागरिकांना पाणी टंचाई समस्या भेडसावणारा तोच बंधाऱ्यात पाणी आले आणि शेती आवर्तन देखील येणार असल्याने भविष्यातील काही दिवस तरी दुष्काळाच्या झळा काही प्रमाणात दिसून येणार नाही.आणि पाणी टंचाई मात करण्यासाठी मोठा आधार मिळणार असल्याने पाचेगाव बंधाऱ्यात पाणी दाखल होताच काही शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार,नामदेव काळे,धर्मा तुवर,इमामपूर सोसायटीचे मा अध्यक्ष भाऊराव काळे,इमाम पूर गोणेगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच आप्पासाहेब काळे,दगडू पवार,विकास पवार,सिद्धार्थ गायकवाड, गौरव आढाव आदी शेतकऱ्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आहे.


पाचेगाव बंधाऱ्यात पाणी आडविण्याच्या आधीच पाणी बंधाऱ्यातुन बाहेर–
ऐन उन्हाळ्यात नेवासा तालुक्यातील तीन बंधाऱ्यात पाणी सोडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला,पण पाचेगाव व पुनतगाव या दोन्ही बंधाऱ्यातुन पाणी गळती मोठ्या प्रमाणत होती.त्या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या निदर्शनास शेतकऱ्यांनी गेल्या चार वर्षांपूर्वी या बाब लक्षात आणून दिली.पण गेल्या चार वर्षापासून पाटबंधारे विभागा कडून वरिष्ठ पातळीवर फक्त प्रस्ताव सादर करीत आहे,पण त्यावर गेल्या चार वर्षांपासून त्या बंधाऱ्याच्या डागडुजी साठी निधी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पाणी

धरणाची पाणी परिस्थिती-
धरणसाठा- १५ मार्च २०२५ अखेर

=============
भंडारदरा:::::: ८५८३ दलघफु

विसर्ग :::: ८३० क्यूसेक

निळवंडे:::::::: २४९६ दलघफु

विसर्ग::::::::१७०० क्यूसेक

पाणी
पाणी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पाणी
पाणी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *