नेवासा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची तालुक्यातील कामे तातडीने पूर्ण करा व कामास विलंब करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करा, अन्यथा २१ एप्रिल रोजी या विभागाच्या अहिल्यानगर येथील कार्यकारी अभियंता कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा प्रदेश काँग्रेसच्या कामगार विभागाच्या उत्तर महाराष्ट्रप्रमुख संभाजी माळवदे यांनी दिला.
नगर जिल्ह्यात पाणीयोजनांची कोट्यवधी रुपयांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत सुरू आहेत. यात सात ते दहा गावे मिळून एक योजना अशा योजनाची कामे सुरू आहेत. साठवण टाक्या, पाण्याच्या स्त्रोतापासून गावापर्यंत पाईपलाईन टाकणे, गावांतर्गत पाईप लाईन टाकणे अशा कामांचा समावेश आहे.

या योजना काही केल्याने पूर्णत्वास जाण्यासाठी तयार नाहीत. या योजनांचा पूर्णत्वाचा कालावधी देखील उलटून गेला आहे. कालावधी उलटून वर्ष होण्यास आली आहेत. टाक्यांची कामे अपूर्ण आहेत. पाईपलाईनची काम अपूर्ण आहे. गावांतर्गत लाईन टाकण्यास सुरुवातच झाली नाही, याला कारण म्हणजे ठेकेदारांचा हलगर्जीपणा व त्यांना पाठीशी घालणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी आहेत. कामे पूर्ण न झाल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याची दखल घेत माळवदे यांनी या विभागाचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन चर्चा केली.
निवेदन देताना काँग्रेसचे शहराध्यक्ष अंजूम पटेल, बसपचे हरीश चक्रनारायण, गुलाब पठाण, सतीश तऱ्हाळ, भारतीय स्वाभिमानी संघांचे गणपत मोरे, संदीप मोटे आदी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.