
नेवासा | अविनाश जाधव : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत शिरेगाव ता. नेवासा येथील शेतकऱ्यांनी गुरुवारी नेवासा तहसीलदार डॉ. संजय बिराजदार यांना निवेदन दिले.

शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की, सन 2017 व 2019 च्या कर्जमाफीत बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळाला. त्यांना केवळ 50 हजार रुपयांचे तुटपुंजे अनुदान देण्यात आले. मात्र नियमित कर्ज भरणारा शेतकरी हा सोने-नाणे गहाण ठेवून देखील वेळेवर कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन म्हणून किमान 2 लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नानासाहेब जाधव, रंगनाथ होन, गंगाधर जाधव, अविनाश जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







