
घोडेगाव – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी, लांडेवाडी, हनुमान वाडी येथे दि. १ रोजी झालेल्या अवकाळी पावसाने परिसरातील शेती पिकांची तसेच घरांची देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पाठपुराव्याने नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याची कामे आता अंतिम टप्प्यात आले आहे.

त्यामध्ये गणेशवाडी येथे गहू- ८० हेक्टर, कांदा-१३५, मका-५० एकुण २६५ हेक्टर तसेच लांडेवाडी मध्ये गहू-८५, कांदा-१३५, मका-५५ एकुण २७२ हेक्टर गणेशवाडी सजेतील दोन ही गावचे मिळुन ५३७ हेक्टर वरील पंचनामे करण्याचे कामे पूर्ण झाली आहे.त्याच प्रमाणे उर्वरित शेतीचे पंचनामे देखील लवकरच पूर्ण होतील असे ग्राम महसूल अधिकारी श्रेयश पाटील यांनी सांगितले.ग्राम महसूल अधिकारी श्रेयश पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी विद्या काळे, कोतवाल आदिनाथ बेल्हेकर यांनी प्रत्यक्ष पहाणी करत कामकाज केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







