
नेवासा- रब्बी हंगामात गव्हाचे क्षेत्र पाण्याच्या उपलब्धतेमुळे मोठ्या प्रमाणात होते. आता गव्हाची काढणी तथा सोंगणी पूर्ण झालेली आहे. गव्हाची काढणी बहुतांशी शेतकऱ्यांनी हार्वेस्टरच्या सहाय्याने केली आहे त्यामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात काड शिल्लक राहतो या गव्हाच्या काड म्हणजे सेंद्रिय पदार्थ होय सेंद्रिय पदार्थ जमिनीचा आत्मा आहे हा गव्हाचा काड कुजल्यानंतर त्याची जमिनीला अनेक फायदे होतात विशेषतः जिवाणूंची संख्या वाढते जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते

जमिनीमध्ये हवा खेळती राहते आज जमिनी सेंद्रिय पदार्थाच्या भुकेलेल्या आहेत कारण माती तपासणी मध्ये असे आढळून आले आहे की जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब फार कमी होत चालला आहे त्याचा परिणाम जमिनीच्या आरोग्यावर वस्तूवर होतो. जमिनीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ कुजविणे आवश्यक आहे हा गव्हाचा काड कमी खर्चात सहज उपलब्ध होतो तो सहज कुजविण्यासाठी कल्चर वापरावे व त्याबरोबर शक्य असल्यास एकही अर्धी युरिया पावसाळ्याच्या सुरुवातीला जमिनीला दिल्यास गव्हाच्या काडाचे उत्तम सेंद्रिय खत तयार होते तरी शेतकरी बंधूंनी गव्हाचा काड जाळू नये असे आवाह न कृषी शास्त्रज्ञ डॉ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केले आहे


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







