नेवासा (अहिल्यानगर) : अवकाळी पावसाने नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून कांदा व गहू पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. काढणीस आलेला कांदा सडला असून गहू पिक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार गोसावी यांना सादर करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या निवेदनाची प्रत District Collector Office तसेच Department of Agriculture Maharashtra यांच्याकडे पाठवण्यात आली आहे.
निवेदनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे सुरू करण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असूनही अद्याप पंचनामा झाला नाही, अशा शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कांदा व गहू पिकांसाठी योग्य नुकसान भरपाई, पीक कर्ज स्थगिती/माफी, तसेच पीक विमा योजनेअंतर्गत तात्काळ मदत देण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ज्ञानेश्वर सांगळे, अॅड. पांडुरंग औताडे, बाळासाहेब खर्जुले, जालिंदर आरगडे, अनिल विधाटे, मधुकर शिंदे,पांडुरंग नवले, विकास कोतकर यांनी दिला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







