
नेवासा – भारत देश खाद्यतेलाच्या संदर्भात स्वयंपूर्ण होऊ शकतो आज आपण आपल्या देशासाठी फार मोठ्या प्रमाणात खाद्यतेल पाम ऑइल व इतर तेल आयात करतो ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. काँग्रेस व तदनंतर भाजप सरकारची धोरणे या अनुषंगाने अत्यंत चुकीची ठरल्यामुळे देशाला खाद्यतेल मोठ्या प्रमाणात आयात करावे लागतात आपल्या देशात पाम इंडस्ट्री फार चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकत होती.

तसेच पाम बागेसाठी आपल्या देशातील जमीन व पाणी तसेच हवामान अनुकूल आहे. पाम ची झाडे मोठ्या प्रमाणात लागवड करून बागा विकसित करणे सहज शक्य होते व आहे त्यापासून पाम इंडस्ट्री विकसित करून पाम तेल मोठ्या प्रमाणात भारतात उत्पादित करता आले असते.

इतरही करडई सूर्यफूल शेंगदाणा सोयाबीन यांना चांगली भाव देऊन व शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढीसाठी योजना पथकदर्शक प्रकल्प करता आले असते व त्यामुळे देशात खाद्यतेलाचे उत्पादन भरीव झाले असते व देश भारत खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असता तथापि बाहेरून खाद्यतेल आयात करताना फार मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण व्यवहार होतात यापुढील काळात खाद्यतेलाचे संकट वाढत जाणार अशी आधार शंका वाटते तरी विचारवंतांनी या विषयावर कृपया गांभीर्याने विचार मंथन करून देशाला दिशादर्शक करावे अशी अपेक्षा डॉक्टर अशोकराव ढगे यांनी व्यक्त केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







