घोडेगाव– नेवासा तालुक्यातील गणेशवाडी , विठ्ठलवाडी, हनुमानवाडी लांडेवाडी,सह सोनई परिसरात दि. १ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने थैमान घातले होते. या मध्ये गहू, कांदा, हरभरा या सह चारा पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांना अजुन गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या नुकसानीची विमा कंपनीने भरपाई दिली नाही तोच पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून काढत शेती पिकांची मोठी नुकसान झाली हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अवकाळी पावसाने घरावरील पत्रे, विद्युत खांब यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिसरात साधारण पणे पाचशे ते सहाशे हेक्टर वरती पिकाची नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तरी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी .

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







