ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
मारहाण

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील बेल्हेकरवाडी येथे शेतीला पाणी देण्यासाठी बोअरवेल सुरू करण्याच्या कारणावरून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि२ रोजी सकाळी दहा वाजता दिलीप आसाराम बेल्हेकर वय. ४८ हे आपल्या शेतातील कांद्याला पाणी द्यायचे असल्याने खत टाकत असताना त्या ठिकाणी अभिजित दिलीप बेल्हेकर हा तेथे आला व तु बोअरवेल ची मोटार चालू करायची नाही. बोअरवेल माझ्या शेतात आहे मि चालु करणार असे म्हणल्याचा राग आल्याने फिर्यादीस शिवीगाळ करु लाथाबुक्यानी मारहाण केली.

मारहाण

सदरचे भांडण सुरु असताना त्या ठिकाणी सुरेखा दशरथ निमसे,शिवराम दशरथ निमसे, सागर दशरथ निमसे विळ्याने व लाकडी दांड्याने पत्नी मनिषा दिलीप बेल्हेकर व मुलगा अभिजित दिलीप बेल्हेकर यांना मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे दाखल फिर्यादी मध्ये म्हटले आहे. दि. २ रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा र. नं. २४/२०२५ बिएनएस चे कलम ११८(१),११५(२), ३५२,३५१(२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बाळासाहेब बाचकर हे करत आहेत.

मारहाण
मारहाण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मारहाण
मारहाण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मारहाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!