गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे महाशिवरात्री निमित्ताने सुरू असलेल्या सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने झाली. कलियुगातील मुख्य आम्रृत म्हणजे कथा किर्तन होय. माया जिंकायची असेल किर्तन ऐकावे. ति जिंकणे मोठे जिगरी चे आहे. नामाने सर्व जिंकता येते. भक्ती आपण आपल्या उध्दरासाठी करत असतो. देवाचे चरित्र हे उच्चारण्यासाठी आहे. आचरणात आणण्यासाठी नाही.

सप्ताह हा माणसे जोडण्याची कामे करत असतो. या ठिकाणी कुठलाही जातिभेद नसतो. असे प्रतिपादन शंकर महाराज डोईफोडे आळंदी देवाची यांनी काल्याच्या कीर्तनात बोलताना सांगितले.
या वेळी आमची विठ्ठलराव लंघे, सचिन देसरडा,पंचगंगा उदोसमुहाचे प्रभाकर शिंदे, किसनराव गडाख, सरपंच कैलासराव दरंदले, नारायण दहिफळे, तंटामुक्ती चे अध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजक ज्ञानदेव लोहकरे , दादा होन, अनिकेत महाराज शिंदे, सारंगबुवा थोरात,आसाराम आव्हाड, मधुकर दरंदले संजय भोर नागापुरकर, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.