नेवासा – तालुक्यातील खुपटी येथे नवभारत फट्रीलाझर तर्फे शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला त्यामध्ये आपली शेती शास्वत शेती शास्वत पद्धतीने करू, जैविक कीटकनाशकाचा वापर करू संगोपन मित्र कीटकाचे करू, जैविक चा वापर उत्पादनाला पडेल भर, करू सापळ्याचा उपयोग अनु बॉड आळी वर नियंत्रण, कंपोस्टिंग खताचा वापर करू जमीन सुपीक करू, सुरक्षा साधनाचा वापर करू मानवी आरोग्य सांभाळून, बालमजुरी टाळा समृद्ध पिढीत घडवा, झाडे लावा झाडे जगवा, मोनोचा वापर टाळू किटकाचा आळा घालू असा मंत्र शेतकऱ्यांना देण्यात आला .
शेतकऱ्यांना जैविक शेती व सेंद्रिय शेती बद्दल नवभारत फर्टीलायझर लिमिटेड कंपनी च्याअधिकाऱ्यांनी सेंद्रिय शेती व जैविक शेती बद्दल माहिती दिली. दिवसेंदिवस शेती नापिक बनत चाललेली आहे. यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे असे
मार्गदर्शन कंपनी प्रतिनिधी श्री अमोल वाघमारे यांनी केले .या कार्यक्रमात गावातील शेतकरी वर्गातून किशोर कूरे,अरुण गव्हाणे,अरुण माळी ,नमदेव शिरके,अनिल शिंदे, तसेच कंपनीच्या वतीने शिवप्रसाद वानखेडे, कार्तिक पिटेकर, पवन देशमुख सहभागी झाले होते .
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.